Adam
December 24, 2016
माणसाला नेमकं काय हवं असतं? हि कादंबरी सुरू होते तामिळनाडूमधील एका गावात एका तामिळ ख्रिश्चन कुटुंबामध्ये आणि आपली ओळख होते वरदा राजनायकशी. कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवगीय कुटुंबसारखच राजनायक कुटुंबीय; वडिलांचा सचोटीचा स्वभाव, त्यामुळे त्यांना मिळणारा आदर आणि होणाऱ्या बदल्या, आईने एका निर्णायक क्षणापर्यंत कुटुंबावर ठेवलेली पकड, दोन्ही मोठ्या बहिणी आणि ह्या सुरक्षित जगात वयात येणारा वरदा. […]
